न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र मिळण्यास गुरुवारी सुरुवात झाली. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पहिल्या दिवशी २७ जणांनी ४९ नामनिर्देशन पत्र नेले आहेत, मात्र एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.
नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवहीमध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जात असून, यामध्ये दिनांकासह नामनिर्देशनपत्र नेणाऱ्या उमेदवाराचे नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, उमेदवाराच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी नामनिर्देशन पत्र घेत असल्यास त्याचे नाव, राजकीय पक्षाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आदी बाबींची नोंद केली जात आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्यांना नामनिर्देशन पत्राची प्रत दिली जात आहे.